आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने हिताचे निर्णय घेतलेले आहेत .आजच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. काही अटींमुळे नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान, याची दखल घेत पूरग्रस्तांना,तसेच अतिवृष्टी धारक शेतकरयांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येणार आहेत असे निर्देश दिले.लाखो शेतकरी या अनुदानापासून वंचित असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात आले. या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शासन दरबारी रूपये ५० हजार रुपये अनुदान देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत, जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 र